You are currently viewing Vasant More: राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वसंत मोरे ढसाढसा रडले, वसंत मोरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली

Vasant More: राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वसंत मोरे ढसाढसा रडले, वसंत मोरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली

मनसेचे पुण्यातील धडाडीचे नेते श्री. वसंत मोरे यांनी मंगळवारी आपल्या मनसे पक्ष सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून वसंत मोरे हे पुण्यातील मनसे या राजकीय पक्षातील प्रमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते.

परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या गैर वागणुकीमुळे वसंत मोरे हे गेले कही दिवस नाराज होते. आपल्याला पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना आमंत्रित केले जात नव्हते तसेच त्यांना एक सहभागी म्हणून डावलले जात होते. ही खंत वसंत मोरे यांना पदोपदी जाणवत होती.

वसंत मोरे

हे अनेकदा त्यांच्या बोलूण्यातूनही दिसून येत होते. अखेर आज त्यांनी सोशल मीडियावरुन मनसेला रामराम ठोकत असल्याचा निर्णय जाहीर केला. पुण्यातील राजकीय वर्तुळात मोरे यांच्या असलेल्या पराभवाची पावती म्हणजेच यांना ‘तात्या’ या नावाने ओळखले जाते.

तात्यांच्या राजीनाम्याने मात्र मनसेच्या अंतर्गत गोटात भूकंप आला आहे. वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण मात्र बदलताना दिसून येत आहे.

श्री. वसंत मोरे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. तसेच याद्वारे त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले. आतापर्यंत मनसेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉटसअॅपद्वारे माझ्याकडे राजीनामे पाठवले आहेत, पण मी कोणावरही पक्ष सोडण्याची सक्ती केलेली नाही. हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, असे त्यांना वाटत आहे.

तरीही मी माझ्या परीने परिस्थिति सावरण्याचा पूर्ण प्रयत्न केला. इतर माझ्यासोबत येऊ इच्छिणाऱ्या लोकांना, कोणीही पक्षसंघटना सोडू नये, असे सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाऊल हे पुर्णपणे वैयक्तिक असल्याचे दिसून येईल. परिणामस्वसरूप यापुढे पक्ष सोडायचा की अतोनात जपायचा, हे त्यांना स्वआकलनातून निर्णय असल्याची मोकळीक त्यांना नक्कीच आहे असे वसंत मोरे यांनी म्हटले.

पुण्यातील मनसेच्या कार्यकारिणीने राज ठाकरेंना चुकीचा रिपोर्ट दिला: वसंत मोरे

या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी मनसेच्या पुणे शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. तसेच पुण्यातील मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठवला. मनसे पुणे लोकसभा मतदारसंघात लढू इच्छित नाही. ही एक धक्कादायक बाब म्हणून जगासमोर येत आहे. पुण्यात मनसेचा प्रभाव नाही, असे वातावरण पक्षाच्याच नेत्यांनी तयार केले.

वसंत मोरे

राज ठाकरे पुण्यात आले होते त्यापूर्वी काही राजकीय घटना घडत होत्या. मात्र पुढे त्यांनीच अर्थात नेत्यांनी शाखाध्यक्षांच्या मिटींग घेतल्या. त्यांना सांगण्यात आले की, राज ठाकरेंनी तुमची बैठक घेतली तर त्यांना सांगा की शहरात साधारणपणे जेमतेम वातावरण आहे.

मनसेने निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. मनसे सैनिकांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे, पण नेत्यांना नाही. त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांकडून मुंबईला चुकीचा अहवाल पाठवण्यात आला, असा आरोप मोरे यांनी केला.

वसंत मोरे

पुण्यातील महाराष्ट्र सैनिक मला पाठिंबा देतात, तर इतर नेत्यांना देत नाहीत, हीच त्यांची खरी अडचण आहे. मी पुण्याचा शहराध्यक्ष असताना पक्षसंघटना वाढवली. आता मात्र  तीच संघटना संपवण्याचे काम मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून सुरु आहे. यासंबंधीची माहिती श्री. वसंत मोरे यांद्वारे कळवण्यात आली. येत्या काळात नवे अनुभव सांगा .

एकूणच, शहरातील राजकीय वर्तुळावर लक्ष ठेवल जाणं आणि त्या अनुसार शासन नीती मध्ये बदल करणं गरजेच आहे.    

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी काही आठवडे का राजीनामा दिला. का ते जाणून घ्या…

Section 144 In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पुणे शहरात १४४ कलम लागू, काय आहे कारण?

मराठा आरक्षण : सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटीकडून चौकशी

e-Shram card benefits: हे कार्ड काढा केंद्र सरकार देतंय २ लाखापर्यंतचा अपघात विमा या कार्डचे नेमके फायदे काय?

आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मोदी सरकारचा काय प्लॅनिंग आहे?

नवीन रस्त्यावरून दोन तासात पुणे ते छत्रपती संभाजीनगर व्हाया नगर

विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी 2024: स्मृतिस विनम्र अभिवादन!

Leave a Reply